मुंबई

अंतर्गत वादांमुळे दोन्ही आघाड्यांमध्ये वाद निर्माण

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वादांमुळे दोन्ही आघाड्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडीमध्येही मतभेद निर्माण झाल्याची चिन्ह आहेत. सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगणार आहे. परंतु, त्यातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे संजय निरुपम संतापले आहेत.

संजय राऊतांनी शिवसेना संपवली, असं वाटतं का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही संपवत आहेत. ज्याप्रमाणे मुंबईत जोर देऊन सहा पैकी पाच जागा घेण्याचा हट्ट आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा घेण्याचा हट्ट त्यांनी केला. त्यांच्याकडे काही नाहीय. त्यांचे नेते पळाले, त्यांचे कार्यकर्ते पळाले. त्यांचे मतदार किती हेही माहीत नाही. तरीही जबरदस्ती करून ते आमच्याकडून जागा घेत आहेत. मी आज भाकित करून जातो की मुंबईमध्ये पाचच्या पाचही जागा शिवसेना गमावणार आहे.