१८ जून मुंबई: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in/ या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकर्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि.१८) दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी १
Read moreकृषी
देशात पहिल्यांदाच केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित
चांगला पायंडा पडल्याने प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी केंद्रीय कृषि मंत्र्यांना देखील भेटणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई – तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली
Read moreपावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करा : हवामान विभाग प्रमुखांचा सल्ला
अकोला: मान्सून राज्यात दाखल झाल्याने बळीराजा आनंदी आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. राज्यातील शेतकर्यांनी शेतीच्या मशागतीला सुरूवात केली आहे. परंतु, हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर यांनी पावसाचा जमीनीतील ओलावा, वातावरण आणि पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करावी, अन्यथा पावसाची वाट बघावी, असा सल्ला राज्यातील शेतकर्यांना दिला आहे. डॉ. होसाळीकर म्हणाले की, ‘गतवर्षापेक्षा यंदा नैऋत्य
Read moreआवक वाढताच हरभऱ्याच्या भावात पुन्हा घसरण
मुंबई – या वर्षी हरभऱ्याच्या भावात चांगलीच घसरण झाली. या आठवड्यात कापसाचे भावदेखील कमी झाले आहेत. हरभऱ्याच्या दारात पुन्हा घसरण झाली आहे. हरभऱ्याचा हमीभाव ५,४४० रुपये आहे. हरभऱ्याच्या किमती गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यानी घसरून ५,६५० रुपयांवर आल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यापासून हरभऱ्याचे भाव सतत घसरत आहेत. रबी पिकांपैकी हरभऱ्याची आवक आता वाढू लागली आहे. हरभऱ्याच्या दरात
Read moreअमरावतीमध्ये देशातील पहिली डिजिटल संत्रा बाजारपेठ
वरूड (अमरावती) : संत्राबागांवर रोगराई ओसरल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे बहराला ताण न बसणे आणि त्यातच निर्यातीतील अडचणी असल्याने व्यापा-यांकडून मिळत असलेला कमी दर या बाबीतून होणारी संत्राउत्पादकांची कुचंबणा थांबविण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुडात स्थापन झाली आहे. शेतक-यांना आणलेल्या संर्त्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही हमखास दर येथे मिळत आहे. खासगी
Read moreराहुरी कृषी विद्यापीठाला उच्च न्यायालयाची चपराक
नवी दिल्ली : राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेवेत असलेले सहाय्यक अधीक्षक कुणाल दिंडे यांची विद्यापीठ प्रशासनाने ११ महिन्यातच नंदुरबार येथे बदली केली. बदली रद्द करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी त्याविरोधात खंडपीठात धाव घेतली. बदली नियमांचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
Read more“भात तेथे समृध्दी ‘ आणण्याचे विद्यापीठाचे लक्ष्य कुलगुरु – डॉ. संजय भावे
दापोली : ‘भात तेथे गरिबी’ हे पूर्वीचे चित्र बदलवून ‘भात तेथे समृध्दी’ आणण्याचे विद्यापीठाचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी आज येथे केले. राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार विद्यापीठातील संचालक, शास्त्रज्ञ आणि विविध शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरु परिषद दालनात करण्यात आले होते.
Read moreबोंडअळी नियंत्रणासाठी फरदड निर्मूलन आवश्यक-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे
१६ जानेवारी अकोला: गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. चालू वर्षी खरीप हंगामात पेरणी उशिरा झाल्याने सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्यात आहे. जादा उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र वर्षभर
Read moreअकोला शहरात अवकाळी पावसाच्या सरी; शेतकर्यांमध्ये धास्ती
९ जानेवारी अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मंगळवार, दि.९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आगामी दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, शेतकर्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात मागील दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे चित्र
Read moreअवकाळीच्या नुकसानीची शेतकर्यांना वाढीव दराने मिळणार मदत!
९ जानेवारी अकोला : महिनाभरापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या अहवालासह पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या १९ डिसेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र शासन निर्णयानुसार वाढीव दरानुसार जिल्ह्यातील मदतनिधी मागणीचा अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील
Read more