![](https://www.dainikrajyonnati.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211001-WA0398-300x169.jpg)
५०लाख रुपयांची ही रक्कम, रोकड स्वरूपात ईश्वरदास देवाशी यांनी कशासाठी आणि कोठून आणली, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. शासनाने दोन लाख रुपयांच्या वरील रकमेचे आर्थिक व्यवहार हे ऑन लाईन पद्धतीने करायचे, असे बंधनकारक करण्यात आले असल्यावरही,ईश्वरदास यांनी५०लाख रुपयांची रोकड खासगी बस मधून मुंबईला कशा साठी घेऊन जात होते, हे अजून स्पष्ट झाले नाही. ही रक्कम हवाल्याची आहे का?तसेच हे ५०लाख रुपयांची रोकड ब्लॅक मनी आहे का या दिशेने पोलीस तपास करतील का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.५०लाख रुपयांची रक्कम लुटल्याच्या या घटनेवरून, खासगी बस मधून प्रवास करणाऱ्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.५०लाख रुपये लुटीच्या घटनेत, राणा ट्रॅव्हल्सचा मॅनेजर सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, लक्झरी बस सेवा चालविणाऱ्याचे संबंध, गुन्हेगारी टोळ्यांसोबत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.या अगोदर घडलेल्या प्रवाशांना लुटीच्या घटनेचा,३०सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेशी संबंध आहे का, या दिशेने तपास होण्याची गरज आहे.
Post Views: 683