क्रीडा

अखेर अष्टपैलू खेळाडूचा होणार ४ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट

मुंबई – टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टँकोविच यांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज हार्दिक आणि नताशा दोघांनीही घटस्फोटाची घोषणा करून या चर्चांना पूर्णविराम दिला. आमचा ४ वर्षांचा संसार होता. आम्ही या काळात अनेक चांगले क्षण जगलो. आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्य याला

Read more
क्रीडा

श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाची धुरा सूर्याकडे

कोलंबो – श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. वनडे संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर वनडेचे कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. महत्वाचे म्हणजे, वनडे आणि टी २० संघाचे उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची

Read more
क्रीडा

अल्काराझने दुस-यांदा पटकावले विम्बल्डनचे जेतेपद

लंडन – आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला विम्बल्डनच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. २१ वर्षीय कार्लोस अल्काराझने जोकोविचचा पराभव करत ग्रँडस्लॅम जिंकली. अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने विम्बल्डन चॅम्पियनशीप २०२४ वर नाव कोरले. रविवारी (१४ जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल स्थानावर असणा-या कार्लोस अल्काराझने अनुभवी नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. ३ सेटपर्यंत झालेल्या

Read more
क्रीडा

भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही: बीसीसी आय

मुंबई – चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. बीसीसीआयने आयसीसीकडे भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसू शकतो, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू

Read more
क्रीडा देश

राहुल द्रविड KKR संघात दाखल होणार

मुंबई – 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडने गमतीने सांगितले होते की, तो आता बेरोजगार आहे आणि नवीन नोकरीच्या शोधात आहे. आता बातमी आली आहे की द्रविडला नवीन नोकरी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर राहुल द्रविड लवकरच आयपीएलमध्ये दिसणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर राहुल द्रविड लवकरच गौतम गंभीरची जागा घेणार आहे.

Read more
क्रीडा

विराट कोहली लंडनला पोहोचताच अनुष्का शर्मा हिने शेअर केला खास फोटो

लंडन- T20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली हा भारतामध्ये दाखल झाला. वानखेडे स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो आपल्या टीमसोबत उपस्थित होता. मात्र, त्यानंतर गुरूवारी रात्री विमानतळावर विराट कोहली स्पॉट झाला. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लगेचच विराट कोहली हा लंडनकडे रवाना झाला. यावेळी विराट कोहली याचे मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अनुष्का

Read more
क्रीडा

संजू, जयस्वाल आणि चहलच्या वाटेला इतर खेळाडूंप्रमाणे 5 कोटींची रक्कम

मुंबई – टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियाला मिळालेल्या बक्षिसी रकमेची सर्वत्र चर्चा होत आहे. बीसीसीआयने दिलेली बक्षिसाची रक्कम ही आयसीसीच्या बक्षिसी रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे अनेकांना 125 कोटींचा आकडा पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला. कारण गेल्या 11 वर्षात अनेक चढउतार पाहात टीम इंडिया आणि क्रीडा

Read more
क्रीडा

१९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंकेत होणा-या या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे असेल. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी कायम आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ खालील प्रमाणे आहे. हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष,

Read more
क्रीडा

वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून १२५ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी एक्सवरून ही माहिती दिली. बक्षिसाची ही रक्कम खेळाडू , प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वाटली जाईल. बार्बाडोस येथे झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी २० वर्ल्डकपच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या

Read more
क्रीडा

विराट, रोहितनंतर जडेजाचा टी-२० क्रिकेटला अलविदा

मुंबई – टीम इंडियाने दि. २९ जून रोजी रात्री टी-२० विश्वचषक जिंकल्याने भारतीय क्रिकेटप्रेमी आनंदात न्हाऊन निघाले. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या शिलेदारांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताने तब्बल १७ वर्षांनंतर जेतेपद पटकावले. पण विराट, रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली. या दोन

Read more