नवी दिल्ली, 30 एप्रिल : ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 100 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ‘स्व ते संपूर्ण’ आणि अहं ते वयंचा प्रवास आहे. मन की बात हा त्यांच्यासाठी आध्यात्मिक प्रवास बनला आहे. यावेळी त्यांना त्यांचे मार्गदर्शक लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण झाली. पंतप्रधान म्हणाले की,
Read moreAuthor: राज्योन्नती ब्युरो
सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील एकोणीस नागरीक मायभूमीत दाखल
नवी दिल्ली : सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत आज पालम वायुसेना विमानतळावर वायुसेनेचे विशेष विमान (सी-१७) ४०० भारतीय नागरिकांना घेऊन दाखल झाले आहे. यात महाराष्ट्रातील १९ नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या सहकार्य कक्षाच्या माध्यमातून सुदान येथून परत
Read moreचिथावणीखोर वक्तव्यावर कडक कारवाई करा, तक्रार आली नाही तरी सुमोटो कारवाई करा
सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना निर्देश प्रतिनिधी/२९ एप्रिल मुंबई: चिथावणीखोर भाषणासंबंधी जर कोणतीही घटना घडली आणि त्याची तक्रार जरी नोंद करण्यात आली नाही तरीही त्यासंबंधी गुन्हा नोंद होईल याची खात्री करावी असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. या प्रकरणाच्या जरी तक्रारी आल्या नाहीत तरीही राज्यांनी सुमोटो दखल घेत कारवाई करावी
Read moreनऊ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे आंध्रप्रदेश हादरले
प्रतिनिधी / २९ एप्रिल मुंबई : आंध्रप्रदेशमधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल नुकतच जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेतील अपयश सहन न झाल्यामुळे नऊ विद्यार्थांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता ११ वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेचे निकाल बुधवारी घोषित करण्यात आले होते. दरम्यान गुरूवारपर्यंत एकूण नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून इतर दोन
Read moreविशेष लेख : होरपळ
काळाबरोबर कोणत्याही वस्तूंचे दर वाढत असतात आणि महागाईची चर्चा होत असते; मात्र या दरवाढीच्या झळा थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतात तेव्हा त्याचे वाईट परिणाम समाजातील सर्व घटकांवर होत असतात. पेट्रोल, डिझेलच्या किमतीतील वाढीमुळे महागाईची चर्चा गेले काही आठवडे सुरू आहे. त्याला अधूनमधून गॅस दरवाढीचा तडका मिळत असतो; परंतु स्वयंपाकाच्या घरगुती वापराच्या गॅसच्या दरातील पन्नास रुपयांची ताजी वाढ
Read moreसंपादकीय : …प्रकल्पही लटकला
भारताची खनिज तेल आयात विक्रमी ८७ टक्क्यांवर गेल्याची बातमी येत असताना आपल्या कोकणातील बारसू येथे तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून जे झाले ते एके काळच्या सर्वश्रीमंत महाराष्ट्राची भिकेची भूक किती अचाट वाढलेली आहे, हे दर्शवते. मुळात हा प्रकल्प नाणार येथे येणार होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रयत्न केले. पण तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची मर्जी राखण्यासाठी
Read moreडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ वसतीगृहाचे उद्घाटन
शासनाच्या निर्णयांमुळे शेतकरी व कृषिक्षेत्राला पाठबळ-कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रतिनिधी/२९ एप्रिल अकोला : राज्य शासन हे शेतकर्यांना आणि कृषीक्षेत्राला पाठबळ देत आहे. त्यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आताही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. येथील डॉ.
Read moreकर न भरल्यामुळे ९६० नागरिकांना प्रतिनिधी/२९ एप्रिल कोर्टाची नोटीस;आज कोर्टात लोकअदालत
प्रतिनिधी/२९ एप्रिल माझोड : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या माझोड गावातील नागरिकांनी घर कर व पाणी कर न भरल्यामुळे तब्बल ९६० नागरिकांना कोर्टाची नोटीस बजावण्यात आली आहे. रविवार दि.३० एप्रिल रोजी तडजोड करण्यासाठी लोकअदालत मध्ये हजर राहावे लागणार असल्याची माहिती सचिव प्रज्ञा वानखडे यांनी दिली. न्यायालयाने दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले की,अर्जदार ग्राम पंचायत माझोड यांनी
Read moreबार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व
बार्शीटाकळी बाजार समितीवर सहकार गटाने आपली सत्ता अबाधित राखली आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं ‘सहकार पॅनल’च्या झेंड्याखाली एकत्र निवडणुक लढविली. यात १८ पैकी तब्बल १५ जागा जिंकत सहकार आघाडीनं बार्शीटाकळी बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली. तर वंचित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या आघाडीला फक्त ३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Read moreअकोट बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप आघाडीचा झेंडा
अकोट बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळी प्रचंड चुरस होती. तब्बल चार पॅनल एकमेकांच्या विरोधात येथे उभे ठाकले होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचं सहकार पॅनल, ठाकरे गट-राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं ‘शेतकरी पॅनल’, वंचितनं सर्वपक्षीय बंडखोरांना घेत उभं केलेलं पॅनल आणि शेतकरी पॅनलमधून फुटलेलं चौथं बंडखोर पॅनल. मात्र, ‘सहकार पॅनल’ने १८ पैकी तब्बल १५ जागा जिंकत
Read more