kasba-byelection-must-be-won-chandrakant-patil
पुणे

पुणे : कसब्याची निवडणूक जिंकायचीच -चंद्रकांत पाटील

पुणे, 18 फेब्रुवारी  : कसब्याची निवडणूक ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने ती जिंकायचीच आहे, विधानसभेत कायदे केले जातात, राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असल्याने तेथे भाजपचाच आमदार गेला पाहिजे.

शेवटच्या दोन दिवसात काँग्रेस तुमच्या कडे ‘गांधी’ घेऊन प्रचारात येतील. त्याला तुम्ही नाही म्हणत भाजपलाच मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ लोकजनशक्ती पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. लोकजनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय अल्हाट, सरचिटणीस अमर पुणेकर, के. टी. पवार, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.