महाराष्ट्र

नाशिक : ‘स्वाभिमानी’चे रस्ता रोको आंदोलन

नाशिक, 22 फेब्रुवारी : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील वणी येथे कांदा रस्त्यावरती फेकून आंदोलन करण्यात आले यामुळे महाराष्ट्र गुजरात महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील वणी येथे शिर्डी – सुरत महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि रस्त्यावरती कवडीमोल भावात मिळणारा कांदा तसेच द्राक्ष फेकून निषेध देखील नोंदवण्यात आला. या प्रसंगी कृती समितीचे प्रशांत कड , गंगाधर निखाडे, संतोष रेहरे , संदीप उफाडे यांच्या सज्ञ शेतकरी नेते , शेतकरी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व इतर नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषण देखील केले या भाषणांमध्ये सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याची टीका देखील करण्यात आली आहे तसेच काही शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्ष देखील शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याची टीका देखील केली आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की, आज शेतकरी मोठ्या अडचणीत आहे राज्य सरकारने आदेश देऊनही कोणत्याही प्रकारची मदत जिल्हा बँकेकडून होत नाही तसेच विद्युत मंडळाकडून वीज कनेक्शन तोडू नये असे आदेश असतानाही वीज कनेक्शन तोडले जाते फळे भाजीपाला यांचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यासाठी अनुदान देणे आवश्यक आहे परंतु ते देखील दिले जात नाही यासारख्या अनेक घटना आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना एकत्रित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करावे या हेतूने हे रस्ता रोको आंदोलन केले गेले येणाऱ्या काळात सरकारने याची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.