क्राईम

 शहनाज खून प्रकरणी, तीन आरोपींना जन्मठेप तर एकास ५वर्षांचा तुरुंगवास!

सोलापूर सत्र न्यायालयाचा महत्त्व पूर्ण निकाल!
सोलापूर५ऑक्टोबर:-बहुचर्चित सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील शहानाज खून प्रकरणी न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर या खून प्रकरणात मदत करणाऱ्या रिक्षा चालकाला ५वर्षे तुरुंगवास असा महत्त्व पूर्ण निकाल सोलापूर सत्र न्यायालयाने दिला.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील घाडगे दूध डेअरीसमोरील ,संजय नगर झोपडपट्टीतील रमजान मन्नू शेखचे लग्न  शहनाज हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, रमजान मन्नू , त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, शेजारीण शाहीन रहिमान शेख यांनी पाच वर्षांच्या चिमुकलीला  ठार करून, त्या परिसरातील विकास हॉटेलजवळ फेकून दिले होते. या कारणामुळे त्यांच्या घरात वाद निर्माण झाला होता सुर. याच वादातून रमजान, अम्मा व शाहीन या तिघांनी २ ऑगस्ट २०१८ रोजी शहनाजला जबर मारहाण केली. या मारहाणीत शहनाज जखमी होऊन बेशुद्ध  होऊन शहनाजचा मृत्यू झाला आणि त्यांनंतर शेजारी राहणारा रिक्षावाला दिलदार तकदीरखान सौदागरला बोलावून त्याच्या मदतीने,मृतक शहनाजचा मृतदेह त्यांनी रिक्षातून अक्कलकोट सरकारी दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आणला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून  शाहीनने तिचे दोन्ही पाय तर अम्माने दोन्ही हात पकडले आणि रमजानने एक्सा ब्लेडने शहनाजचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी शहनाजचा मृतदेह पोत्यात भरून रमजानच्या दुचाकीवर ठेवला आणि शाहीनच्या मदतीने त्यांनी तोळणूर येथील रेल्वे रुळ गाठून, शहानाजचा मृतदेह रेल्वे रूळावर फेकुन अपघात दाखविण्याचा बनाव केला होता, परंतु पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून सत्य समोर आणले,शहानाजचा मृतदेह रेल्वे रूळावर असल्याची खबर, त्यावेळी ड्युटीवर असलेले गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी मृताची खबर अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानंतर सरकारच्या वतीने पोलिस हे. कॉ. धनसिंग राठोड यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने  तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, आरोपींनी दिलेली कबुली, यावर सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना दोषी ठरवत तिघांना जन्मठेपेची तर एका आरोपीस५वर्षाची शिक्षा सुनावली. या खून प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्ही. एस. जाधव यांनी केला तर कोर्टपैरवी म्हणून पोलिस हे. कॉ.  कोळी यांची मोलाची मदत झाली.