ताज्या बातम्या

असंघटित कामगारांना मिळणार आयुष्यमान भारत योजनेचा लाभ!

 

नवी दिल्ली२७सप्टेंबर:-१५ हजारापेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या असंघटित कामगारांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.या योजने अंतर्गत १५हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या असंघटित कामगाराला कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास किंवा आजारी पडल्यास,उपचारासाठी५लाखांपर्यंत खर्च मिळणार आहे.परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.या योजने अंतर्गत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटूंबाला२लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळणार आहे.आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी मदतही उपलब्ध होईल.कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाइन नंबर 14434 वर संपर्क साधू सकता. तसेच www.gms.eshram.gov.in पोर्टल मार्फत कोणतीही तक्रार दाखल करु शकता. असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार, घर काम करणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, स्थलांतरित आणि प्लॅटफॉर्म कामगार, कृषी कामगार, मनरेगा कामगार इत्यादींचा समावेश होतो. परंतु, यांचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असणं गरजेचं आहे.जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाला लिंक असेल, तर तुम्ही स्वतः नोंदणी करु शकता. यासाठी ई-श्रम पोर्टल www.eshram.gov.in वर भेट द्यावी लागेल. तसेच ज्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांना नोंदणी करण्यासाठी सीएससीला जावं लागेल. अशा कामगारांची नोंदणी बायोमॅट्रिक पद्धतीनं केली जाईल. ई-श्रम कार्डाला सीएससीकडून कागदावर प्रिंट करुन कामगारांना दिलं जाईल. तसेच इथे नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.ज्या कामगारांचं,  वय १६ ते ५९ वर्षे आहे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) किंवा राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) जे या सुविधांचे लाभार्थी नाहीत. असे कामगार, जे आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत. असे कामगार, जे सरकारी कर्मचारी नाहीत,असे कामगार या योजनेचा लाभ घेतील.