Groundwater levels in have decreased
अमरावती

अमरावती जिल्ह्यातील २० गावांमधील भूजल पातळी खालावली

अमरावती : जिल्ह्यातील वरुड,नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा, धारणी या तालुक्यातील २० गावांमधील भूजल पातळी खालावली आहे. काही ठिकाणी भूजल पातळी २० मीटरपेक्षा जास्त खाली गेल्याचे जिल्ह्यातील १७१ विहिरींच्या नोंदविलेल्या निरीक्षणातून ही बाब समोर आलेली आले.

जलविज्ञान प्रकल्पांतर्गत मॉर्कोलॉजिकल वर्गीकरणाच्या आधारे १७१ निरीक्षण विहिरी निवडण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर, डिसेंबर, मार्च आणि मेमध्ये त्याचे मॅन्युअली त्रैमासिक निरीक्षण केले जाते. याव्यतिरिक्त, समांतर आणि खोल पाण्याच्या पातळीचे मासिक निरीक्षण करण्यासाठी ५५ पायझोमीटर ड्रिल केले गेले आहेत आणि हा डेटा जीईएमएस वेबसाइटवर अद्ययावत केला जातो. या माहितीचा वापर भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेच्या पुढील अभ्यासासाठी आणि निरीक्षण प्रणालीसाठी केला जात आहे. या अभ्यासासाठी १५० पाणी गुणवत्ता केंद्रांची निवड करण्यात आली. जे पाण्याच्या गुणवत्तेच्या आधारावर बीएस-स्टेशन, टीएस-स्टेशन आणि टी-स्टेशनमध्ये विभागले गेले. रासायनिक जिवाणू विश्लेषणासाठी दरवर्षी पाण्याचे नमुने घेतले जातात.

भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी सांगितले की, जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग हा बहुतांशी डोंगराळ असून तो जंगलांनी वेढलेला आहे. उत्तर- पश्चिम भाग घनदाट सागवान जंगलाने व्यापलेला आहे. मध्यवर्ती भाग शुद्ध जलोदराने झाकलेला आहे, एकूण क्षेत्रफळ ३०५३ चौरस किलोमीटर आहे. उतार ९ मीटर खोल ते १५ किलोमीटरपर्यंत आहे. ईडब्ल्यू उतार१५ मीटर खोल ते १५ किलोमीटरपर्यंत आहे. पूर्णा जलोदरामध्ये गाळ, चिकणमाती, वाळू यांचा समावेश होतो. तर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी माती, दगड आणि खडे आहेत.या क्षेत्राची एकूण व्याप्ती २५ टक्के आहे. तर इतर ७५ टक्के क्षेत्र डेक्कन ट्रॅप आहे. जे बहुतेक जोडलेले, वेसिक्युलर बेसाल्ट प्रकारचे असते. अमरावती जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १२,२१२ चौरस किलोमीटर असून ते महाराष्ट्राच्या केवळ ३.९७ टक्के आहे. अमरावती जिल्ह्याचा ७५टक्के भाग डेक्कन ट्रॅपने व्यापलेला आहे तर २५ टक्के क्षेत्र पूर्णा ल्युव्हियमने व्यापलेले आहे. पूर्णा ल्युव्हियमचे एकूण क्षेत्रफळ ३,०५३ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १,५६२ चौरस किलोमीटर क्षारपड क्षेत्राशी संबंधित आहे. जे गुणवत्ता प्रभावित क्षेत्र आहे. या भागात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी भूजलाचा वापर होत नाही. तर जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागात प्रामुख्याने संत्रा पिकाला जास्त पाणी दिले जाते. ज्यामुळे भूजलात असंतुलन निर्माण होते.