akola-grain-market
अकोला अर्थ

हरभर्‍याला शासनाचा ५ हजार ३३५ रुपयांचा हमीभाव, तर खुल्या बाजारात शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक

अकोला: हरभर्‍याला शासनाचा हमीभाव ५ हजार ३३५ रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभर्‍याला व्यापारी कमी भाव देत आहेत. खुल्या बाजारात हरभरा ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.

यामध्ये शेतकर्‍यांना जवळपास एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. नाफेडच्या वतीनं ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळं शेतकरी खुल्या बाजारात हरभरा विकत आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसतोय.राज्यभरात यावर्षी २९ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड राज्यभरात यावर्षी २९ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून हरभरा कढणीची लगबग सुरु आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी तर हरभर्‍याची काढणी केली आहे. दरवर्षी, नाफेडच्या माध्यमातून राज्यात विविध राज्य अभिकर्ता संस्थेकडून किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी केला जाते. यामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तांदूळ, कापूस, हरभरा पिकांचा समावेश असतो.

सध्या शेतकर्‍यांनी हरभरा पिकाची काढणी केली आहे. मात्र, नाफेडकडून अद्याप काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरु झाली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं शेतकरी खुल्या बाजारात हरभर्‍याची कमी दराने विक्री करत आहेत. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.हरभर्‍याचा हमीभाव ५ हजार ३०० असल्याने शेतकर्‍यांनी नोंदणी करण्यासाठी खरेदी केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सध्या शेतकर्‍यांकडे हरभरा घरात पडून आहे. बाजारात ४ हजार २०० ते ४ हजार ४०० रुपये दर मिळत असल्याने सगळ्या शेतकर्‍यांचा कल नाफेडकडे आहे. कारण नाफेडचे हमीभाव हे ५ हजार ३०० रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांची नोंदणीसाठी खरेदी केंद्रावर गर्दी होत आहे. अमरावती जिल्ह्यात लोकांची गर्दी झाल्याने शेतकर्‍यांना चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे प्रकार सुद्धा समोर आले होते. सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटात सामना करत आहेत.

कांदा दराचा प्रश्नही ऐरणीवर ला आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी चिंतेत सापडला आहे. प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा दर कांद्याला मिळत आहे. त्यामुळं सरकारनं कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान द्यावं असी मागणी केली जात आहे. तसेच हवामानात सातत्यानं बदल होत आहे. या बदलाचा देखील शेती पिकांवर परिणाम होत आहे.