क्राईम

साकीनाका बलात्कार प्रकरणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीची बैठक!

एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करून, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे आदेश!दोषारोपपत्र दाखल करतांना त्रुटीठेवणाऱ्याची गय केली जाणार नाही!मुंबई११सप्टेंबर:-मुंबईतील साकी नाका परिसरात झालेल्या महिलेवरील बलात्कार आणि त्या नंतर पीडित महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकल्याने, पीडित महिलेच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासह मुख्य सचिवासह प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करून, या बैठकीत साकीनाका बलात्कार प्रकरणी एक महिन्याच्या आत, या प्रकरणातील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, दोषारोपपत्रात त्रुटी ठेवल्यास,त्याची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.साकी नाका येथे घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी पोलिसांनी बाजू घेत,साकीनाका येथील घटनेबाबत  पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत  त्याठिकाणी पोहचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले आणि कुठेही वेळ दवडला नाही, असे बोलून पोलीसांची बाजू राखली.या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक  संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.  मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी तसेच पोलिस करीत असलेल्या तपासाविषयी जाणून घेतले व एकूणच चौकशीवर समाधान व्यक्त केले.मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय , इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.त्याचप्रमाणेहा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहून पिडीत दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई हे देशातील एक सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. लोकांचा पोलिसांवर आणि कायदा व सुव्यवस्था यावर विश्वास आहे. मात्र अशा घटनेमुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे असे मत मुुुुख्यमंत्री यांनी व्यक्त केले. यावेळी काही महत्वपूर्ण सुचना पोलिसांना केल्या. महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी. महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उदभवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र  वेळोवेळी भेटी द्याव्यात.स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणी देखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी. महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे. गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असल्याने, वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले.

.